Followers

Friday, September 30, 2016

नवरात्रीमागील इतिहास

नवरात्रीमागील इतिहास

१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

२. नवरात्रीमागील महत्त्व

१. `जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.

`उपांग ललिता' ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.

२. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात `श्री दुर्गादेव्यै नम: ।'' हा नामजप जास्तीतजास्त करावा.

३. घटस्थापना

        घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्‍ती) मिळते.

४ .अखंड दीपप्रज्वलन करणे

           दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

५ . नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे :

      नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.


६ . देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी
.

ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

७ . कुमारिका-पूजन कसे करावे ?

१. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. `नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी `नऊ'' या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.

२. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे.

३. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.

४. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.)

५. कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.'


८. देवीपूजनाच्या वेळी शक्‍तीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळया

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. शक्‍तीतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे देवीला शेवंती, निशिगंध, कमळ इत्यादी फुले वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही शक्‍तीतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते; म्हणून अशा आकृतीबंधांनी युक्‍त रांगोळी काढतात. (असे काही आकृतीबंध पुढे तक्‍त्यात दिले आहेत.)

रंगांनुसार रांगोळीत देवतेचे तत्त्व आकृष्ट होणे

९ . `गरबा खेळणे'' म्हणजे काय ?

गरबा खेळणे'' यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे  देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्‍तीयुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडळ हे देवीचे प्रतिक होय.

Thursday, September 29, 2016

जळगांव शहराचा इतिहास

जळगांव शहराचा इतिहास :
आजचे जळगाव महानगर हे पूर्वी 19 व्या शतकात म्हणजे 1862
सालापर्यत खान्देश ( धुळे ) जिल्हातील नशिराबाद तालुक्यातील जळगाव
बु।।. म्हणून ओळखले जाणारे छोटेसे गांव होते. आज जळगांवातून केळी,
मेहरूणची बोरे, कापुस, ओरिंएट सिमेंट, सुप्रीम पाईप, जैन पाईप भारताबाहेर
पुरविण्यार्या जळगाव शहराला तसा फारसा प्राचीन इतिहास नाही. एकाही
ग्रंथात जळगांव चे नाव आढळत नाही. जळगांवची मूळ जूनी वस्ती
गोपाळपूरा ही होय.
जळगाव मिरर
जिल्हातील फैजपुर, चोपडा, धरणगाव, अमळनेर, एरंडोल इत्यादी गावांची
नावे इतिहासात आढळतात. जळगांव शहराच्या परीसरातील कापसाचे प्रचंड
उत्पादन परदेशात (इंग्लंड) पाठविण्याच्या हेतूने इंग्रजांनी 1852 साली
ठाणे ते भुसावळ रेल्वेमार्ग निर्माण केला. या रेल्वेमार्गावर जळगांवचे
स्थान आल्याने खर्या अर्थाने जळगांवचे भाग्य बदलले व जळगांवच्या
विकासास चालना मिळाली. जिल्हाचे व तालुक्याचे मुख्यालय नशिराबादहून
जळगांवी आले. विकसाची गती तेव्हापासुन आजपर्यत कायम आहे. नंतर
1862 साली जळगांव नगरपालीकेची स्थापना झाली. तद्नंतर मुंबईच्या
मुलजी जेठा कंपनीने खान्देश मीलची स्थापना केली स्व:ताच्या नावाने
भव्य मु. जे. महाविद्यालयाची स्थापना केली नंतर बँका, सहकारी संस्था,
1906 साली स्वतंत्र नेतृत्वासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना
झाली. अनेक शालेय संस्था, कार्यालये, औद्योगिक वसाहत, उत्तरोत्तर
जळगांवचा विकास होऊ लागला. जळगांव नगरपालीकेचा विकास कामामुळे
आज शहरातील महानगरपालीकेची 17 मजली इमारतीने जळगांवचे वैभव
भारतभर नेले. 19 व्या शतकातील एका लहानशा खेड्याचे रुपांतर 21 व्या
शतकात महानगर झाल्याने जळगांवचा इतिहास पूर्णपणे वैभवशाली झाली
आहे.
जळगाव मिरर
जळगांव शहर.....
१८६०. सुरत-भुसावळ. रेल्वे सुरु झाली...
१८६२. जळगांव येथे कॉटन मार्केट सुरु झाले.
८.मार्च १८६४.रोजी नगरपालीकेची. स्थापना झाली.
२४.डिसेंबर १८६४रोजीनगरपालीकेची पहिली सभा झाली
मेहरुण तलाव ते रथचौक लोखंडी पाईप टाकुन जळगांवला सरळ तलावाचे पाणी पुरवले जात असे.
१८६९.आप्पा महाराजांनी श्रीराम मंदीराचा जिर्णोद्धार केला
१८७१.जळगांव शहराची पहिली जनगणा झाली लोकसंख्या ६८९३.
१८७२.श्री आप्पा महाराजानी मुक्ताईची पालखि सुरु केली.
१८७४,खांन्देश मिलचा पाया घातला गेला .
१८७५.पहिली मराठी शाळा व लायब्ररी सुरु.
१८७६.पहिला दवाखाना सुरु.
१८७७.वल्लभदास वालजी वाचनालय व टाऊन हॉल सुरु झाले
१८८०.पहिले साप्तहीक प्रभोधचंद्रीका सुरु झाले
१८८३.श्री आप्पा महाराजानी राम मंदीराचा वापर शाळे साठी सुरु केला
१८८५. म्युन्सिपल स्कुल बोर्ड सुरु झाले व जळगांव तालुका झाला.
१९०७ जळगांव जिल्हा निर्मिती
१९०८.श्री म्हाळस नगरपालीकेचे पहिले नगरअध्यक्ष
१९०९.बँक अॉफ बॉम्बे सुरु झाली.
१९१०.जळगांवला टेलीफोन सेवा सुरु
१९२५ ते १९२८.बॉम्बे बरोज म्युन्सिपल अॉक्ट लागु झाला व १० लाखघनफुट क्षमतेचे गिरणा वॉटर वर्क्स योजना कार्यान्वीत.
१९३१.पहिले विद्युत केंद्र सुरु.
१९४२.पहिली टाऊन प्लॉनिंग स्कीम झाली
१९५८.नगर रचना मास्टर प्लॉन-विकास आराखडा मंजुर
१९५९.प्रथमची हद्द ४,१०,चौरस मैल.
१मे१९६०.संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती.
जळगांव जिल्हा म्हणुन मान्यता.
शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय.
१९६२-६३. टी.बी. सॉनेटीरीयम. बालगंधर्व खुले नाट्य ग्रुह रामपेठेत मराठी शाळा व भुयारी गटार योजना
१९६५. महाराष्ट्र नगरपालीका अधिनियम १९६५.लागु
१९६६ तुकाराम श्रीपत चौधरी (कांती शेठ यांचे वडील) न.प. अध्यक्ष. शनिपेठेत हरीजन कॉलनी न प कर्मचार्यासाठी घरकुले दिली
१९६७,१२०.घरकुले नवलनगर व गुरुनानक नगर.
१९७१.न. प. हद्द वाढ ५चौ.कि मी वरुन ८चौ.कि मी.
१९७४विकास आराखडा दुरुस्त
१९७६.१-१०-७६रोजी८चौ.कि.मी. वरुन १२.४४कि.मी
१९७९.जिल्हापेठ पोलीस स्टेशन निर्माण
१९-९-८७ हद्दवाढ १२.४४कि.मी वरुन ६३,२९चौ.कि. मी
१५-८-९० उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ सुरु
६-१-९३.फायनल टाऊन प्लॉनिंग स्कीम मंजुर
२१-३-२००३ जळगाव शहर महानगरपालीका स्थापन